Skip to main content

उसणेच राहिले

जीवनात अनेक वेळेस अनेक जण आपली मदत करतात. आपण बऱ्याचवेळा ती मदत विसरून जातो किंवा ती मदत त्याच व्यक्तीपुरती मर्यादित ठेवतो आणि त्याच्या कर्जातून  मुक्त झालो असे समजतो. अनेकवेळा आपल्याशी कोणी विचित्र व्यवहार केल्यावर आपण त्याला प्रत्युत्तर न देता आपला चांगुलपणा जपतो.
अश्या एक ना अनेक चांगल्या - वाईट गोष्टी आपल्याकडेच राहिलेल्या असतात, उसण्या . 
आणि हे उसणेपन मिटवणे गरजेचे नसतेही परंतु आपल्याला स्वतःला त्याची जराशी जाणीव असावी म्हणून ही कविता .... 

उसणेच राहिले


माणुसकीची जात ,हातातील हात 
उसणेच राहिले 
नेमक्या वेळी धावून येणे 
उसणेच राहिले

जगण्याचे सूत्र ,ज्ञान सगळे पवित्र 
उसणेच राहीले
मी केले मी केले हे बोलणे
उसणेच राहीले.

ओठांतील शब्द ,अनौघ अपशब्द
उसणेच राहिले
प्रेमळ मृगजळ भासवणे
उसणेच राहीले....

          - मानस

🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Marathi Poem (Where is the happiness) | मराठी कविता (सुख कुठेय ?)

सुख कुठेय ? सुख, आनंद, हर्ष शोधण्यात खर्चलं आयुष्य  अन मनातल्या आशेनेच पेललं जीवनाचं शिवधनुष्य  आज मी आलोय दूर कुठेतरी, अखंड चालत ह्या काळोखात. स्वतःलाच हरवून, हातचं राखून.  समोरचा अंधार, वाढतच जातोय पावलागणिक. पण त्या पलीकडे मिळेल मला सुख,  म्हणून मी तग धरतोय.  एक, दोन, तीन, असे अनेक दरवाजे ओलांडून, अनेक शिखरे पायांखाली तुडवून, सह्स्पर्धकांना केव्हाचाच हरवून, कदाचित एकटाच उरलोय.  ऐहिक जीवनात गुरफटून, नवीन स्वप्ने मनात बाळगून, नवे ध्येय नवा ध्यास घेऊन, हा रस्ता तुडवतोय. थकवणारी पायपीट त्यागून, सुटाबुटाचा थाट मिरवून, मनास माझ्या अगदी चिरडून, आनंदाचा स्रोत शोधतोय. येणाऱ्या प्रत्येक दरवाज्याचा रंग वेगळा, ढंग वेगळा, अन् उघडण्याचा प्रसंग वेगळा. हरएकाला ओलांडताना मी, माझा अहंकार, माज वाढतच जातोय.  आणि सुख कुठेय ? हा सवाल मात्र  चित्त भेदून तरीही उरतोय.  - मानस 

Rafu | रफू | Marathi Kavita

म नुष्याच्या आयुष्यात असे बऱ्याच वेळेस होते की तो त्याचा स्वाभिमान गाववून बसतो. त्याच्या मनात एक प्रकारचा न्युनगंड येतो, आणि मग तो त्याचा आत्मविश्वास देखील गमावतो. त्याच्या पदरी पडते ती फक्त अवहेलना. तो असह्य होतो आणि स्वतःच्या मनाला सावरून त्याला रफू करुन, सज्ज होतो पुन्हा तोच अपमान आणि पुन्हा तेच जगणे झेलण्यासाठी. यावरच एक भाष्य म्हणजे ही कविता ...... रफू  झाकलेले वस्त्रात मखमली  तेच जगणे खरकटे, त्याच जखमा पुन्हा पुन्हा  तेच भाग्य कळकटे. ओशाळ असले जीवन जरी  चेहऱ्यावरती हसु खोटे, वाट तुडवतो अनवाणी  तोच चिख्खल तेच काटे, गमावून बसला स्वाभिमान  अन विचार सारे उलटे, असूनी उभा घोळक्यात तो  चित्त तरी हे कसे एकटे. ढासळली स्वप्ने सारी  काय रडे अन काय हसे, रफू करुनि काळजाला प्रश्न तोच तो उभा असे. -  मानस 

गुंता | Marathi Kavita (Poems) | मराठी कविता

गुंता  नात्यांमधे तयार होणारे आणि आपल्याला न कळणारे बरेचसे मतभेद, दुरावे आपल्याच लोकांना आपल्यापासून कसे दूर करतात याचे उदाहरण म्हणजे ही कविता. नकळत माझ्या बऱ्याचवेळा मी ज्यात गुंतत जातो इच्छा नसतांना देखील गुंता कसलासा पडत जातो ... कधी असतो साधासा  सहजपणे सुटत जातो  निशान मात्र स्वतःचे  कुठेतरी उमटवत जातो ... प्रेमाचा, मैत्रीचा, नात्यांचा  मोठा मोठा होत जातो  अचानक मग जीवलग धागा  अजानपणे तुटत जातो ... - मानस