म नुष्याच्या आयुष्यात असे बऱ्याच वेळेस होते की तो त्याचा स्वाभिमान गाववून बसतो. त्याच्या मनात एक प्रकारचा न्युनगंड येतो, आणि मग तो त्याचा आत्मविश्वास देखील गमावतो. त्याच्या पदरी पडते ती फक्त अवहेलना. तो असह्य होतो आणि स्वतःच्या मनाला सावरून त्याला रफू करुन, सज्ज होतो पुन्हा तोच अपमान आणि पुन्हा तेच जगणे झेलण्यासाठी. यावरच एक भाष्य म्हणजे ही कविता ...... रफू झाकलेले वस्त्रात मखमली तेच जगणे खरकटे, त्याच जखमा पुन्हा पुन्हा तेच भाग्य कळकटे. ओशाळ असले जीवन जरी चेहऱ्यावरती हसु खोटे, वाट तुडवतो अनवाणी तोच चिख्खल तेच काटे, गमावून बसला स्वाभिमान अन विचार सारे उलटे, असूनी उभा घोळक्यात तो चित्त तरी हे कसे एकटे. ढासळली स्वप्ने सारी काय रडे अन काय हसे, रफू करुनि काळजाला प्रश्न तोच तो उभा असे. - मानस